Parbhani News : पाणीटंचाई उद्‍भवल्यास अधिकाऱ्यांशी संपर्क साधा

जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन; प्रशासनाकडून विविध उपाययोजना
if you face water scarcity complaint to concerned officials appeal of collector raghunath gawade
if you face water scarcity complaint to concerned officials appeal of collector raghunath gawadeSakal

परभणी : जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाई उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी (ता.२२) केले आहे.जिल्ह्यात पाणी टंचाईच्या निवारणार्थ विविध योजना प्रशासनाकडून राबविण्यात येत आहेत.

तसेच जिल्ह्यात कोणत्या भागात पाणी टंचाई संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास संबंधित गट विकास अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तसेच त्यांच्याकडे पाणी पुरवठ्याबद्दल मागणी करू शकता, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व गटविकास अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगाने विहिर, बोअर अधिग्रहण व टॅकर अधिग्रहण करण्यासंबंधाने आदेश निर्गमित केलेले आहेत. पाणी पुरवठा संदर्भात काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार नोंदविण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

चाऱ्याची आवश्यकता भासल्यास पशुपालकांसाठी पशुसंवर्धन उपायुक्त, कार्यालय, परभणी व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर चारा विक्रेत्याची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com