

Jalna News
esakal
जालना: लग्न सराईमुळे सोने-चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे सराफा बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने खरेदीला ब्रेक लागला होता. आता दरात स्थिरता असल्याने ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळत असून सराफा बाजारात महिनाभरानंतर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.