

Jalna News
esakal
जालना: मागील पाच वर्षांपासून बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध’ मोहीम राबवत तब्बल १०७ बेपत्ता महिलांसह आठ मुलींचा शोध लावला आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील बेपत्ता महिलांचे प्रमाण कमी झाले आहे.
प्रेमप्रकरण, घरातील वाद, रागाच्या भरात मुली व महिला घर सोडतात. अनेकवेळा १८ वर्षे पूर्ण असल्याने मुली प्रियकरासोबत पळून जातात. परंतु, गुन्हा दाखल होताना अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. पोलिस काही दिवस शोध घेतात. मात्र, मुलगी मिळून आली नाही, तर तीन महिन्यांनंतर हा गुन्हा ह्यूमन ट्रॅफिकिंग पथकाकडे वर्ग होतो.