

Jalna News
esakal
जालना: जिल्ह्यातील सात मध्यम आणि साठ लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्यामध्ये मागील सहा दिवसांत तीन टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या जिल्ह्यात ४६.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एप्रिल आणि मे महिन्यासाठी हा पाणीसाठा पुरेसा असल्याने यंदा पाणी टंचाईचे संकट भेडसावणार नसल्याचे चित्र आहे.