Jalna : भाषणबाजी, नेत्यांपायी लग्नघटिकेचा विसर; नव्या ट्रेंडवर पौरोहित्य करणाऱ्याचं म्हणणं काय?

लग्नघटिकेचा विसर, इव्हेंटवर जोर
Marriage
Marriageesakal

भोकरदन : लग्न लावण्यासाठी खास मुहुर्त काढले जात असले तरी लग्नघटिकेचा मात्र प्रत्यक्षात अनेकांना विसर पडत आहे. परिणामी लग्न लागण्याआधी वरात, राजकीय सत्कार, भाषणबाजी, सूत्रसंचालकांचा माईकवरील ताबा यातच टाईमपास होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.

भारतीय संस्कृतीत विवाह हा संस्कार महत्वाचा संस्कार मानला जातो. लग्नासाठी खास मुहुर्त काढले जातात. मात्र अलिकडे मुहुर्तावर लग्न लावणे दुरापास्त होऊ लागले आहे. कारण विवाह सोहळ्याला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. त्यात वरातीतील नाचगाण्यांमुळे लग्न सोहळ्याला उशीर होतो, त्यानंतर राजकीय मंडळी, व्हीआयपी पाहुणे यांच्या सत्कारात वेळ निघून जातो. सोबतच फोटोसेशनही येते. ते झाल्यावर भाषणबाजी सुरू होते.

इतके कमी की काय सूत्रसंचालन करणारी व्यक्ती माईक हातात आला की उपस्थितांची नावे घेण्यात, कविता, शेरोशायरी, वैचारिक व भावनिक भाषण करण्यात वेळ दडवतो. सूत्रसंचालक काही केल्या माईकचा ताबा लवकर सोडत नसल्याचा अनुभवही अनेकांना आलेला आहे. या सर्व बाबींमुळे लग्नाचा मुहुर्त टळतो, आणि भलत्याच वेळेला लग्न लावले जात असल्याचे दिसून येत आहे.

सूत्रसंचालन नवीन फॅड

लग्नामध्ये सूत्रसंचालन ही एक नवीन प्रथा आली आहे यामध्ये सूत्रसंचालकांकडून लग्नात येणाऱ्या राजकीय,प्रतिष्ठित व्यक्तीची माईकवर नावे घेणे,सत्कारासाठी बोलावणे हे त्यांचे काम असते, मात्र सूत्रसंचालक बऱ्याचदा यात गाणे,शेरो शायरी,कविता करताना मुहूर्तचे भान विसरतात सूत्रसंचालन करणारे काही महाभाग आपल्याच पद्धतीने मंगलाष्टक देखील म्हणतात. बऱ्याचदा वेळेअभावी या सूत्रसंचालकांना राजकीय नेतेमंडळींकडून समज देखील देण्यात येते.

पंचांगातील पाच अंगातून २१ दोष काढून ठरवलेली उत्तम वेळ म्हणजे मुहूर्त असते. लग्न ठरवताना प्रामुख्याने वधूवरांच्या पत्रिकेतील गुरुबळ व चंद्र बळ बघितले जाते मुहूर्तावर लग्न लावल्याने वधूवरांच्या पत्रिकेतील गुरुबळ व चंद्रबळ यांचा उत्कर्ष प्राप्त होतो. त्यांच्या वैवाहिक जीवनातील भरभराटीसाठी व सौख्यासाठी ते उपयुक्त असते.

मात्र मुहूर्त टळल्यानंतर चंद्र व गुरु यांना बळकटी भेटत नाही व येणाऱ्या आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. सोळा संस्कारांपैकी एक मुख्य संस्कार म्हणजे विवाह. काळानुसार बरेच संस्कार लोक पावत चालले आहेत. सोळा दिवसाचा असणारा विवाह सोहळा एका दिवसात आला, त्यातही मुहूर्त वेळ कोणीही पाळत नाही. धर्मशास्त्रात मुहूर्ताविषयी महत्व सांगितले आहे.

— राम कुलकर्णी, पुरोहित, भोकरदन

मंगलाष्टक म्हणजे मंगल घटनेचा समूह. मंगलाष्टकामध्ये काही गोष्टींची शिकवणूक देण्यात आलेली आहे. त्यामुळे मंगलाष्टक हा एक संस्कार आहे. अनेकदा पुरोहिताच्या हातातून माईक घेऊन इतरच कोणी मंगलाष्टक म्हणतात हे अत्यंत चुकीचे आहे. हा संस्कृतीचा, वेळेचा आणि परंपरेचा विपर्यास आहे.

— संतोष महाराज आढावणे आध्यात्मिक मार्गदर्शक, भोकरदन

पत्रिकेत लग्नाची वेळ फक्त लिहिण्यापुरता असते, अनेकदा लग्नाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. लग्नासाठी आपण जी वेळ देतो ती कटाक्षाने पाळली पाहिजे. वेळेवर लग्न न लागल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची गैरसोय होते.

— डॉ.रामनाथ काळे,नागरिक, भोकरदन

पत्रिकेत लग्नाची वेळ फक्त लिहिण्यापुरता असते, अनेकदा लग्नाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. लग्नासाठी आपण जी वेळ देतो ती कटाक्षाने पाळली पाहिजे. वेळेवर लग्न न लागल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची गैरसोय होते.

— डॉ.रामनाथ काळे,नागरिक, भोकरदन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com