Jal Samadhi Protest: जायकवाडी धरण फुगवट्याने शेती उद्ध्वस्त; भरपाईअभावी अंमळनेर-लखमापूर शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलनानंतर आमरण उपोषण

जायकवाडी धरणाच्या फुगवट्यामुळे वीस वर्षांपासून पिकांचे शंभर टक्के नुकसान; भरपाई, संपादन, संयुक्त मोजणी व सुधारित अहवालाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधीनंतर आमरण उपोषण सुरू
Agrarian Crisis: Backwater Flooding of Jayakwadi Dam Devastates Gangapur Farms

Agrarian Crisis: Backwater Flooding of Jayakwadi Dam Devastates Gangapur Farms

Sakal

Updated on

कायगाव : जायकवाडी धरणाच्या फुगवट्यामुळे अंमळनेर व लखमापूर (ता. गंगापूर) परिसरातील शेतीचे गेल्या वीस वर्षांपासून मोठे नुकसान होत असून, भरपाई व संपादनाबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १८) अंमळनेर शिवारात गोदावरी पात्रात जलसमाधी आंदोलन छेडले. प्रशासनाच्या विनंतीनंतर रात्री साडेनऊ वाजता जलसमाधी आंदोलन मागे घेऊन शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com