court
Esakal
उदगीर, (जि. लातुर) - शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एट डी. बी. म्हालटकर यांनी गुरुवारी (ता.८) रोजी हा निकाल दिला.