
औसा (लातूर): औसा तालुक्यातील जवळपास साठ टक्के खरीपाच्या पेरण्या उरकल्या असताना गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. दररोज पडणारे कडक उन आणि वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे जमिनीची ओल कमी होत आहे. त्यामुळे जमिनीत पेरलेले बियाणे उगवते का नाही अशी चिंता पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना सतावत असतानाच पेरणीला उशीर होत असल्याने पेरणी न केलेले शेतकरीही धास्तावले आहेत. काही ठिकाणी पाऊस पडेल या आशेवर पुरेशी ओल नसताना पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट येते की काय अशी भिती निर्माण झाली आहे.
एक लाख एकवीस हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या औसा तालुक्यात खरीपाचा पेरा जवळपास एक लाख हेक्टरच्या वर होतो. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असतो. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र साठ ते सत्तर हजार हेक्टरच्या वर आहे. यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार भरपूर पाऊस आणि वेळेवर मान्सूनचे आगमन होणार होते. तशी सुरुवातही झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी करण्यासाठी पेरणीची घाई केली. आता चार दिवसांपासून पाऊस थांबला आहे.
साठ टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या असल्याने आता पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. तर चाळीस टक्के शेतकरी अजून पुरेशी ओल नसल्याने थांबले आहेत. पेरणी झालेल्या आणि पेरणी न झालेल्या दोन्ही क्षेत्रांना पावसाची नितांत गरज असताना दररोज कडक उन व जोरदार वारे वाहत आहे. त्यामुळे कशी बशी ओल टिकवून ठेवलेली राने आता कोरडी पडू लागली आहेत. एकीकडे बियाण्याच्या तुटवड्याचा सामना करीत पेरणी केलेले क्षेत्र आता पावसाच्या दडीमुळे संकटात आले आहे.
...पुरेसा पाऊस झाल्या शिवाय पेरणी करु नका....कृषी विभागाचे आवाहन-
याबाबत तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांनी सांगितले आहे की, औसा तालुक्यात सर्वदूर पाऊस झालेला नसल्याने व मध्येच पाऊस दडी मारत असल्याने शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. सोयाबीन हे सरळ वाण असल्याने घरचे बियाणे त्याची उगवण क्षमता तपासून पेरावे. पेरणीपुर्वी बियाण्याचा बिज प्रक्रिया करुन पेरणी करावी. बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयबीनची लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.