जिंतूर - तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतच्या महिला सरपंच पार्वतीबाई शेषराव हरकळ यांचा स्वातंत्रदिनी देशाची राजधानी दिल्ली येथे सन्मान होणार. यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागातर्फे त्यांना आमंत्रित करण्यात करण्यात आले..२०२३ पासून पार्वतीबाई कुंभारी ग्रामपंचायत सरपंचपदी विराजमान आहेत. आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सार्वजनिक सोयीसुविधांसह अनेक उल्लेखनीय कामे केली. राज्य व केंद्र सरकारच्या जनहिताच्या विविध योजना राबविल्या..यामध्ये ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला.गावातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले, पेव्हर ब्लॉक बसवले. शौचालयांचे बांधकाम शंभर टक्के पूर्ण केले. स्मशानभूमीवर शेड उभारून रस्त्याचे काम केले. जिल्हा परिषद शाळेत पाणीपुरवठा, शैक्षणिक साहित्य व इतर कामे केली. महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत १३ बचतगट कार्यरत केले. या माध्यमातून अनेक महिलांनी गृहोद्योग सुरू केले..याप्रमाणे अनेक उल्लेखनीय कार्य केले. शिवाय लोकसहभागातून वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीम राबवली जाते. त्यांच्या कार्याबद्दल गटविकास अधिकारी सुभाष मानकर, विस्तार अधिकारी अनिल जाधव यांनी त्यांचे कौतुक केले..जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांच्याकडून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वामी समर्थ केंद्र परभणी यांच्या मार्फत कृषी महोत्सव २०२५-२६ अंतर्गत पुरस्कार देण्यात आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.