लातूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्यात असलेले लातूर विमानतळ आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) सोपविण्यात आले आहे. याबाबतची प्रक्रिया ‘एमएडीसी’च्या मुंबईतील टीमने येथे येऊन पूर्ण केली. .त्यामुळे पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या लातूर विमानतळाच्या विकासाला चालना मिळण्याची, येथून विमानांचे उड्डाण होण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, लातूरसोबतच धाराशिव, बारामती येथील विमानतळेही ‘एमएडीसी’ने आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली..लातूरमधील विमानतळाचा वापर केवळ मंत्री, आमदार करीत आहेत. नागरिकांसाठी ते बंदच आहे. या पार्श्वभूमीवर, ‘लातूर विमानतळ बनले दिवास्वप्नच’ असे वृत्त ‘सकाळ’च्या २५ जूनच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्याची पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दखल घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात १४ ऑगस्टला झालेल्या बैठकीत त्यांनी विमानतळाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ११ ऑगस्टला येथे आढावा बैठक घेऊन विमानतळाचे प्रश्न समजून घेतले होते. त्यानंतर आता विविध घडामोडी घडताना दिसत आहेत..लातूर विमानतळ ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर ‘रिलायन्स’ला देण्यात आले होते. पण, अटी-शर्तींचा भंग केल्याने ‘रिलायन्स’च्या ताब्यातील विमानतळ काढून घ्या, असे आदेश सरकारने ‘एमआयडीसी’ला दिले होते. त्यानुसार ८ एप्रिल २०२५ ला ‘एमआयडीसी’ने विमानतळ आपल्या ताब्यात घेतले. पण, चार महिन्यांनंतरही ‘एमआयडीसी’कडून हे विमानतळ सुरू करण्याबाबत पावले उचलली जात नव्हती..याकडेही ‘सकाळ’ने लक्ष वेधले. त्यामुळे ‘एमआयडीसी’च्या ताब्यातील विमानतळ स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी ‘एमएडीसी’ची चार जणांची टीम गुरुवारी (ता. २१) लातूर येथे आली होती. त्यांनी विमानतळाची पाहणी करून, कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून विमानतळ आता स्वत:च्या ताब्यात घेतले. त्यांना येथील विमानतळाची स्थिती, दर्जा आवडला. त्यामुळे येथून लवकरच विमानांचे उड्डाण सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..यासंदर्भात बोलताना ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता अभय नवघणे म्हणाले, धाराशिव येथील विमानतळ बुधवारी (ता. २०), तर लातूर येथील विमानतळ गुरुवारी (ता. २१) आम्ही ‘एमएडीसी’च्या ताब्यात दिले. आता येथील पुढील कार्यवाही ‘एमएडीसी’ करेल..Latur News: ‘एमबीबीएस’च्या यादीत लातूरचा पुन्हा डंका! राज्यात सर्वाधिक बाराशे विद्यार्थ्यांची निवड.काय आहे ‘एमएडीसी’?महाराष्ट्र सरकारने २००२ मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) स्थापना केली. मुख्यमंत्री हे ‘एमएडीसी’चे अध्यक्ष असून राज्यातील विमान वाहतुकीबाबत पायाभूत सुविधा विकसित करणे या कंपनीचे ध्येय आहे. राज्यात विमानतळ बांधणे, ते चालवणे, राज्यांतर्गत कनेक्टिव्हिटी सुलभ करणे, विमानतळांभोवती नियोजित विकास सुनिश्चित करणे, राज्यातील विमान वाहतूक क्षेत्राच्या एकूण वाढीला प्रोत्साहन देणे ही प्रमुख कामे ‘एमएडीसी’कडे आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.