जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; आंब्याच्या बागांचे नुकसान

rain in jalkot
rain in jalkot

जळकोट (जि लातूर): शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह आज (ता.दहा) चार वाजता पाऊसाला सुरूवात झाली. त्यामुळे आंब्याच्या बागांची मोठ्या प्रमाणात फळ गळती होऊन मोठे नुकसान झाले आहे.

सायंकाळी चारच्या सुमारास आचानक आकाशात काळे ढग जमले होते. चार पासून वादळी वारा, विजेचा कडकडाटसह जोरदार पाऊस सुरु होता. यावर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याला फळ लागले होते. दहा -पंधरा दिवसांत आंबा खाण्यासाठी येत होता. पंरतु अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे आंब्याची गळती झाल्याने बागायतदार व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या कोरोनाचे संकट शेतकऱ्यांच्या भोवती फिरत असताना आता या वादळी वारा व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विजेचा कडकडाटसह मोठा पाऊस झाला. त्यामुळे लाईट गुल झाली होती.

दरम्यान अवकाळी पाऊस व वादळी वारा यामुळे आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बागायदार व शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

अवकाळी पाऊसामुळे चाळीस टक्के आंब्याची गळती झाली असून पडलेला आंब्याला कोणताही ग्राहक हात लावत नाही. त्यामुळे तोडाला आलेला घास अवकाळी पाऊसाने हिरावून घेतला असून पंचनामा करून शासनाने मदत करावी.

-सुनिल अवलवार (आंबा बागायतदार जळकोट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com