

Latur News
esakal
जळकोट : उदगीर, जळकोट आणि चाकूर तालुक्यांतील शेकडो गावांसाठी जीवनवाहिनी असलेल्या तिरू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात चिंताजनक घट झाली आहे. वाढत्या तापमानामुळे होणारे वेगवान बाष्पीभवन आणि पाण्याचा उपसा यामुळे सध्या प्रकल्पात केवळ २७ टक्के साठा शिल्लक राहिला असून, तालुक्यातील सातही बॅरेजेस कोरडे पडले आहेत.