

Parbhani News
esakal
परभणी: राज्यातील वीज दर रचनेबाबत आणि सौर धोरणातील बदलांमुळे ग्राहक व उद्योग क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे सुधारित आदेश आणि महावितरणने सौरऊर्जा क्षमतेवर आणलेले नवीन निर्बंध यामुळे राज्यातील वीज ग्राहक आणि विशेषतः सौरऊर्जा वापरकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नवीन आर्थिक वर्षात वीजदर कपात होणार की जुनाच भार असणार याकडेही लक्ष लागलेले आहे.