

Maratha Reservation Protest Manoj Jarange Accuses Eknath Shinde of Creating Conflict Signals Mumbai Movement
sakal
जालना : ‘‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे मराठा समाजातील चौघांची प्रमाणपत्रे रद्द झाली. मी खरे बोलतो तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेत्यांना राग येत आहे. त्यामुळेच राज्य सरकारचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर येथे दंगल घडविण्याचे षड्यंत्र रचत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे मराठा समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत’’, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला.