Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Manoj Jarange Ends Fast Gives Government Three Months: मराठा आरक्षणासाठी उपोषण मागे घेत सरकारला तीन महिन्यांची अंतिम मुदत; शब्द पाळला नाही तर उपोषण नव्हे, थेट मुंबईवर धडक देण्याचा इशारा
Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands

Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands

sakal

Updated on

बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलनाचे नेते, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेतले असून मुंबई दौरा स्थगित केला आहे. सरकारला तीन महिन्यांचा अल्टिमेटम देत आहोत. या काळात सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर यापुढे उपोषण नाही, तर थेट मुंबई गाठू असा सडेतोड आणि आक्रमक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या निर्णयामुळे मराठा आंदोलनकर्ते व प्रशासनाने तूर्तास सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com