Manoj Jarange : अधिवेशना नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार ; मनोज जरांगे

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ता.20,21,रोजी होत आहे ,या मध्ये सगे सोयरे बाबत कायदा पास करणे,गॅजेट स्विकारणे ,दाखल गुन्हे वापस घेणे आदी महत्वाच्या विषयावर निर्णय होणार आहे .
Manoj Jarange
Manoj Jarangesakal

वडीगोद्री : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ता.20,21,रोजी होत आहे ,या मध्ये सगे सोयरे बाबत कायदा पास करणे,गॅजेट स्विकारणे ,दाखल गुन्हे वापस घेणे आदी महत्वाच्या विषयावर निर्णय होणार आहे .या मध्ये काय निर्णय होतो शासनाची काय भूमिका आहे हे कळेल त्या नंतर मुंबईला जाण्याची व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल असे मनोज जरांगे यांनी शनिवार (ता.17) रोजी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद मध्ये बोलतांना सांगितले.

या ठिकाणी मनोज जरांगे शनिवार (ता.10) पासून उपोषण करत आहे शनिवार ता.17 रोजी त्यांचा उपोषणाचा आठवा दिवस आहे. राज्यात 10 वी ,12 वी च्या परीक्षा सुरू आहे या परीक्षेला विद्यार्थांना जाता यावे या साठी समाज बांधवांनी पुढे होऊन मदत करा , त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका, वाहणे अडवु नका , शांततेत आंदोलन करा , वाटल्यास अधिवेशन होईपर्यंत आंदोलन थांबवा असे जरांगे यांनी सांगितले आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange : ...तर आंदोलन समाजाच्या हाती जाईल : जरांगे,राज्य सरकारला इशारा

मंत्री समिती यांनी लिहुन घेतलेल्या व्याख्या प्रमाणे सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मुळे ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल तसेच गॅजेट ,संस्थान, मंदीर,भाट, या मध्ये नोंदी सापडत आहेत त्यांना हि कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल , शासन आरक्षण टक्केवारी ठरवत आहेत त्याची माहिती नाही परंतु त्या आरक्षण टक्केवारी मध्ये सुध्दा ज्यांना प्रमाणपत्र पाहिजे त्यांनी ते घ्यावे त्यात हि लाभ मिळेल .

शासनाने शिंदे समीतीला मुदतवाढ द्यावी, आमची मागणी ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे अशी आहे ते टिकणारे आरक्षण आहे , मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तो पर्यंत शासन निवडनुका घेणार नाही ,आज हि जिल्हा परिषदेच्या किंवा इतर निवडनुका घेण्यात आलेल्या नाही , शेवटी मते मागण्यासाठी त्यांना आमच्या कडे यायचे आहे मला आशा आहे की, शासन आरक्षणाचा निर्णय होत नाही तो पर्यत निवडुका घेणार नाही .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुलालाचा अपमान होऊ देणार नाही ते मराठा समाजाला आरक्षण देतील असा विश्वास असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर जायचे आहे, उपोषण चालू असतांना जाता येईल का ? याची माहिती घेत आहे नागरीकांनी शांततेत शिवजयंती साजरी करावी असे अवहान मनोज जरांगे यांनी केले आहे.

-दिलीप दखने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com