

sakal
जालना: ‘‘मंत्र्यांचे शिष्टमंडळ चर्चेला आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे वैधता प्रमाणपत्र देऊ, असे सांगून गेले. पण, अद्याप त्याला सुरुवात झाली नाही. शिवाय ५८ लाख नोंदी गावागावांत करून शिबिरेही सुरू झाली नाहीत. त्यामुळे हे मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरात मागील तीन दिवसांपासून आंदोलन मोडीत काढण्याचा डाव साधत आहे का?’’, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.