जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे बुधवारी अंतरवाली सराटीहून (ता. अंबड) पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाले आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून समाजबांधव सहभागी झाले आहेत..आंदोलकांनी स्वतःच्या गावातून वाहन करून महिनाभर पुरेल एवढे धान्य, किराणा, गॅस यासह आवश्यक साहित्य सोबत घेतले आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचे नाही, असा निर्धार जरांगे यांच्यासह समाज बांधवांनी केला आहे..धोत्रा येथून मंगळवारी (ता.२६) रात्री निघालो. बुधवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे पोचलो. गावातून २० जण आलो आहेत. सोबत महिनाभर पुरेल असा किराणा आणि इतर साहित्यही आणले आहे.- कृष्णा सूर्यवंशी, धोत्रा (ता. हतगाव, जि. नांदेड).महिनाभर पुरेल एवढा किराणा, गहू, ज्वारी घेऊन मुंबईला निघालो आहोत. मनोज जरांगे ‘परत चला’ म्हणतील तेव्हाच आम्ही परतू. शेतीची कामे होत राहातील. घरातून एक व्यक्ती याप्रमाणे आम्ही गावातून वीस जण आलो आहोत.- एकनाथ इंगोले, हराळ (ता.वसमत, जि. हिंगोली).गहू, तांदूळ, मूग डाळ, कांदा, गॅस आदी साहित्यासह मुंबईला निघालो आहोत. वाटेत जेथे थांबू तेथे स्वयंपाक करून खाऊ. गावातून बारा जण सहभागी आहोत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही.- नीलेश सस्ते, कानडी (ता. भूम, जि. धाराशीव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.