Marathwada : रात्रीच्या वीज पुरवठ्याने वैतागले शेतकरी जीवाला धोका ,दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी

शेतकऱ्यांकडून सध्या पिकांना पाणी देण्याची लगबग सुरू आहे
Marathwada news
Marathwada newsesakal

बुलडाणा : शेतकऱ्यांकडून सध्या पिकांना पाणी देण्याची लगबग सुरू आहे. शेतीला दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी जागरण करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसभर राबराब राबायचे अन् रात्री शेतात पाणी देण्यासाठी जागायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महावितरणकडून होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा जिल्ह्यात कांदा, सोयाबीन, भाजीपाला, ऊस, ज्वारी, मका, तूर यासह अन्य शेतीपिके आहेत.या शेतपिकांना जगविण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस धडपड करीत आहेत. चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकरी काबाडकष्ट करीत आहेत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वेळेनुसारच नियोजन करावे लागत आहे.

Marathwada news
Weight Loss Tips : डेअरी प्रोडक्ट खाऊन वजन वाढणार नाही तर कमी होणार, सुटलेली ढेरी कमी करण्याचा हा आहे बेस्ट फॉर्म्युला

रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या येथील एका शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना (ता.१२) रोजी सकाळी उघडकीस आली. योगेश डिगांबर टाले (वय ३०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. परिसरातील रब्बीच्या हंगामात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळात रात्रीचा विज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अंधाऱ्या रात्री पिकांला पाणी देण्यासाठी जावे लागते. ता.१० चे रात्री गावातील योगेश टाले(वय ३०) हे काळेपाणी शिवारातील शेतात हरबरा पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता.

Marathwada news
Skin Care Tips: हिवाळ्यात मऊ त्वचा ठेवण्यासाठी कसा कराल मधाचा वापर? जाणून घ्या

रात्री अचानक विज पुरवठा खंडित झाल्यानंतर प्रदिर्घ काळ विज पुरवठा सुरू झाला नाही. विजेच्या प्रतिक्षेत अचानक झोपेची डुलकी लागली. अशातच ते विहीरीत पडले. दिवसभर शोध घेतल्यानंतर (ता.११) रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना त्यांच्या भावाला दिसले.साखरखेर्डा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असता, (ता.१२) रोजी सकाळी योगेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Marathwada news
Uric Acid Control Tips : युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश

आठ तास वीजपुरवठा, तोही रात्रीच

जिल्ह्यात शेतकऱ्यांना २४ तासांपैकी फक्त ८ तासच वीजपुरवठा करण्यात येतो. प्रत्येक उपकेंद्रांतर्गत गावनिहाय वेगवेगळ्या वेळेचे नियोजन महिन्याच्या सुरुवातीला ठरविले जाते. यासंदर्भातील माहिती शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या आधारे दिली जाते. त्यानुसार शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी नियोजन आखतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com