

Beed News
esakal
बीड: मुलगा शासकीय नोकरदार हवा... शिकलेला असावा... सासू-सासरे जवळ नकोत... सर्वात महत्त्वाचे म्हणजे किमान चार ते पाच वर्षे मुलगा शहरात राहणारा असावा... अशा एक ना अनेक अपेक्षा घेऊन बसलेल्या मुली अन् मुलींच्या पालकांमुळे अनेक मुलांचे लग्नाचे वय निघून जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दरम्यान, सर्वत समाजांमध्ये मुलींची संख्याही कमी होत असल्याने अनेकांची लग्ने जमत नसल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे.