Nathsagar : बाष्पीभवनाचा नाथसागरात धरणांमधील जलसाठ्यावर परिणाम; पाणीसाठा आता...

Dam
Damesakal

पैठण : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्म्यामुळे तालुका तापला असतानाच, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बाष्पीभवनाचा जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील जलसाठ्यावर परिणाम जाणवू लागला आहे. धरणांतील जलसाठ्यात घट होत असून, सद्यःस्थितीत ३७.२२ टक्के साठा आहे.

त्यातच यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होण्याचे अंदाज वर्तविले जात असतानाच, खरा पावसाळा जुलैमध्ये सुरू होण्याच्या शक्यतेने जलसाठा टिकवून ठेवण्याचे आव्हान धरण प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

Dam
Maratha Mandir : पवार-शिंदेंची भेट ज्या कारणासाठी चर्चेत आली ती 'मराठा मंदिर' संस्था काय आहे?

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नाथसागर धरण शंभर टक्के भरून वाहिले. परिणामी गोदावरीच्या मोठ्या प्रमाणात पात्रात पाणी सोडावे लागले होते. दरम्यान, सर्वच हवामान खात्यांकडून यंदा संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जलसाठ्यात घट होण्याची शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर उपाययोजनांची प्रशासनाला गरज आहे.

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी १०० टक्के जलसाठा असलेल्या नाथसागरात मोठी घट दिवसेंदिवस होत चालली आहे. यापुढे धरणामधील जलसाठ्याचा विचार करून निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहेत. जर पाऊस कमी झाला व धरणांतील जलसाठा कमीच राहिला तर पुढील वर्षात तालुक्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुरुवारी (ता.२) धरणात ३७ टक्के जलसाठा असल्याची माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली. पावसाळ्यानंतरही अवकाळीने कहर करत, शेतीपिकाचे मोठे नुकसान केले. अगदी एप्रिलपर्यंत अवकाळीचा तडाखा शेतकऱ्यांना सहन करावा लागला. नाथसागर धरणामधील पाणीसाठा मुबलक असल्याने, यंदाचा उन्हाळा सुसह्य गेला. त्यामुळे पाणीटंचाईची अजूनही नाही. मात्र, आता गेल्या महिनाभरापासून वातावरणात प्रचंड उष्मा जाणवू लागल्याने, त्याचा परिणाम जलसाठ्यावरही होऊ लागला आहे.

Dam
Narendra Modi : संसद बांधली पण लोकशाही कुठे आहे? सीताराम येचुरी यांचा सवाल

पुर नियंत्रण पथक स्थापन

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील गोदावरीला आलेल्या पुरामुळे नाथसागराने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे १०२ टीएमसी असलेल्या नाथसागरातून तब्बल २०९ टीएमसी पाणी गोदावरीच्या पात्रात धरण प्रशासनाला सोडावे लागले होते.

यामुळे यंदा मागील वर्षी प्रमाणेच जर पावसाळा सुरु राहिला तर या पुर परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुर नियंत्रण पथकाची धरण प्रशासनाने गुरुवारी (ता.१) स्थापना केली असल्याची माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी सकाळशी बोलताना दिली. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com