Maharashtra Politics : नायगावात ग्रामपंचायत आरक्षणाचा घोळ; ५० टक्के मर्यादा ओलांडल्याने निवडणुकीवर टांगती तलवार!

Naigaon Reservation Issue : नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडतीत ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. फेरआरक्षण झाल्यास ओबीसी आरक्षणाला सर्वाधिक फटका बसू शकतो, अशी चर्चा पुढाऱ्यांत सुरू आहे.
Naygaon taluka’s Gram Panchayat reservation crosses the 50% limit, raising concerns over OBC quota

Naygaon taluka’s Gram Panchayat reservation crosses the 50% limit, raising concerns over OBC quota

sakal
Updated on

नायगाव : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये असे आदेश दिले असल्याने निवडणुकावर टांगती तलवार आहे. मात्र नवीन वर्षात तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जुलै महिन्यात आरक्षणाची सोडत झाली परंतु या आरक्षणातही ५० टक्केची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचे काय होणार असा प्रश्न गाव पुढाऱ्यांना पडला आहे. मागच्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरु झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com