

Latur News
esakal
निलंगा: मूलभूत सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जगणे कठीण झाले असताना, निलंगा तालुक्यात काही गावांमध्ये मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची सोय नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील कांही गावामध्ये स्मशानभूमी नसल्याने अनेक कुटुंबांना दुःखाच्या क्षणीही प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.निलंगा तालुक्यातील अनेक लहान वाड्या, वस्त्या व तांडे आजही विकासापासून वंचित आहेत.