सरकारकडून नथुरामी वृत्तीची पिढी घडविण्याचा कट - एनएसयूआय

NSUI.jpg
NSUI.jpg

औरंगाबाद : सरकारकडून नथुरामी वृत्तीची पिढी घडविण्याचा कट असल्याचा आरोप एनएसयूआयकडून करण्यात आला आहे. देशाच्या एकात्मतेला बाधा पोचविणारी संघटना म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घालण्याचे निर्देश दिलेल्या आरएसएस या संघटनेचा स्वातंत्र्यचळवळीतील योगदान अशा स्वरूपात अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला जात असून, इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या षड्‌यंत्राला एनएसयूआयने विरोध दर्शविला आहे.  

याबाबत मंगळवारी (ता. 09) जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) दिलेल्या निवेदनात म्हटले, 'की सारा देश इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यचळवळीत उतरला होता. त्यावेळी आरएसएस (राष्ट्रीय सेवा संघ) आणि त्यांना मानणारे काय करीत होते?'

ते पुढे म्हेहणाले, 'सर्वश्रुत असताना आरएसएसचा इतिहास शाळेत शिकवण्याचे भयानक कारस्थान या देशात सुरू आहे. या संघटनेच्या अस्तित्वात नसलेला इतिहास काल्पनिक संदर्भाच्या आधाराने अभ्यासक्रमात समावेश करण्यात येत आहे. यामुळे भावी पिढी खऱ्या इतिहासाला पोरकी होईल, त्यामुळे यास आमचा तीव्र विरोध असेल'.

दरम्यान एनएसयुआयकडून देण्यात आलेल्या निवेदनावर अभिषेक शिंदे, हर्षल जाधव, रोहित राठोड, ऋषिकेश लांडे, सोहम जाधव, ऋषिकेश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com