
उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा धसका घेतलेल्या एकाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मात्र तपासणीनंतर त्याला कोणताही आजार नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. दरम्यान, कोरोना विषाणूची बाधा झाल्याच्या भीतीने सदर व्यक्ती प्रचंड घाबरली असून, संबंधितास समुपदेशनाची गरज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
तालुक्यातील समुद्रवाणी येथील एक जण कामानिमित्त पिंपरी-चिंचवड येथे गेला होता. तो सोमवारी (ता. १६) मूळगावी परतला. गेल्या दोन-तीन दिवसांत पुण्यात कोरोनाबाधीतांचा आकडा वाढल्याने प्रचंड घाबरलेल्या त्या व्यक्तीला स्वतःला कोरोना विषाणूची लागन झाल्याचा भास होऊ लागला. त्यामुळे तो थेट गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला. केंद्रातील डॉक्टारांनी त्याची माहिती घेत त्याने केलेल्या प्रवासाची ही माहिती घेतली. तेव्हा तो कोणत्याही कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेला नसल्याचे समजले. शिवाय त्याला ताप, सर्दी अशी लक्षणे ही दिसून आली नाही. मात्र संबंधीत व्यक्ती मोठ्या प्रमाणात घाबरल्याने पूर्णपूणे गोंधळून गेल्याचे दिसून आले.
प्रचंड घाबल्याने त्याचे मानसिक संतूलन बिघडल्याचे लक्षात येताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याने थेट जिल्हा रुग्णालय गाठले. गोंधळेलेल्या संबंधिताची तपासणी करुन डॉक्टरांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवाय तो कुठे राहत होता. यापूर्वीच्या पंधरा दिवसात कुणा कुणाच्या संपर्कात आला का? याची माहिती घेतली. शिवाय त्याच्या मागील पंधरा दिवसांतील प्रवासाची ही माहिती घेतली.
तो कुणाही कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात आला नसल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयातील डॉ. डी. के. पाटील, डॉ. सतीश सुरवसे यांनी त्याची तपासणी केली असता त्याला सर्दी, ताप नसल्याचे, तसेच तशी लक्षणेही नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले; मात्र संबंधीत व्यक्तीला प्रचंड घाबरल्याने स्वतःला कोरोना विषाणूची लागन झाल्याचा भास होत आहे.
समुपदेशन करणार
घाबरलेल्या सदर व्यक्तीवर सध्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स लक्ष ठेवून आहेत. त्याची घाबरलेली मनस्थिती दूर करण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून केला जात आहे. तसेच त्याची भिती घालविण्यासाठी समुपदेशन कराव लागेल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जावू नये. कुठलही भिती बाळगू नये; मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. एखादी व्यक्ति कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आली तरच त्याची संशयीत म्हणून तपासणी करावी लागते. पुण्याहून, मुंबईहून किंवा अन्य महानगरातून मूळगावी आलेली एखादी व्यक्ती संशयीत होत नाही. नागरिकांनी अशा बाबतीत भिती बाळगू नये, असे आवाहन डॉ. गलांडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.