
उस्मानाबाद : जिल्ह्यात एका दिवसात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे; मात्र खबरदारी घेतली तर त्यांच्यापासून फारसा धोका झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागत आहे. तर उस्मानाबाद शहरातून कडप्पा येथे गेलेल्या युवकाला बाधा कशी झाली? याचा छडा लागलेला नाही.
कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या प्रवासाची संपूर्ण हिस्ट्री जाणून घेतली जाते. त्यानुसार तो मागील काही दिवस कोणाच्या संपर्कात आला, कुठे गेला होता? याची माहिती घेऊन संपर्कात आलेल्यांवरही उपचार केले जातात. तसेच त्यांना क्वारंटाइन कक्षामध्ये ठेवले जाते.
हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना
कळंब तालुक्यातील एका दांपत्याला बाधा झाली आहे. हे दाम्पत्य मुंबईवरून गावात आले तेव्हापासून त्यांना शेतात ठेवण्यात आले होते. त्यांचे कुटुंबीय त्यांना जेवण आणून देत होते. त्यामुळे केवळ तेच त्यांच्या संपर्कात आले आहेत. कुटुंबीयांचे स्वॅब नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. तर अन्य एकजण महसूलच्या कर्मचारी आहे.
मात्र गेल्या महिन्यापासून तो कामावर नव्हता. त्याला अन्य काही आजाराने ग्रासल्याची चर्चा आहे. त्यामुळे तो महसूल कर्मचारी उपचार घेण्यासाठी औरंगाबाद येथील दवाखान्यात जात होता. तेव्हा त्याला बाधा झाली असण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. सुदैवाची बाब म्हणजे तो महिन्यापासून कामावर नसल्याने अन्य कोणाच्याही संपर्कात आलेला नसल्याचे बोलले जात आहे.
जाणून घ्या - नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...
कडप्पाच्या विद्यार्थ्याला बाधा झाली कशी?
आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे गेलेल्या एका विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती तेथील प्रशासनाने उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाला कळविली आहे. संबंधित युवक हा प्रशिक्षण घेण्यासाठी उस्मानाबाद शहरामध्ये आला होता. मात्र लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांना त्यांच्या मूळगावी जाता आले नाही. एका खासगी इमारतीमध्ये या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले होते. मंगळवारी (ता. १२) या सर्वांना त्यांच्या गावी सोडण्यात आले.
विशेष म्हणजे त्यांच्यासोबत अन्य वीस जण होते. मात्र त्यातील एकालाही बाधा झालेली नाही. त्यामुळे एकाच प्रशिक्षणार्थीला बाधा कशी झाली? याचा अभ्यास प्रशासन करीत आहे. कदाचित तिकडे गेल्यानंतर ही बाधा झालेली असू शकते. आणि जर इथे झाली असेल तर तो आणि कोणाच्या संपर्कात आला? याचाही कसून शोध घेतला जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन गेलेल्या वाहन चालकांने रस्त्यात कुठेही गाडी थांबली नसल्याचे सांगितले. तरीही त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य सर्वांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.