Osmanabad : शेतकऱ्यांच्या दिवाळीवर संकट

काढणीला आलेले निम्मे सोयाबीन पाण्यात
soyabean farmer news
soyabean farmer newsesakal

जळकोट : सतत पडत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेले निम्मे सोयाबीन सध्या पाण्यात असून काही शेतकऱ्यांनी काढलेल्या सोयाबीनला बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी संकटात सापडली आहे.शेतकऱ्यांचे नगदी समजणारे पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे पाहिले जाते. तालुक्यात वीस हजारावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. सुरवातीला पिकेही चांगली होती. त्यानंतर अधूनमधून पाऊस झोडपत होता.

soyabean farmer news
Osmanabad : उस्मानाबादला पावसाने झोडपले

त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पाऊस असल्याने सोयाबीनची निगराणी करता आली नाही. परिणामी सोयाबीनची वाढ खुंटली पावसाची उघडीप झाल्याने शेतकऱ्यांनी महागामोलाची औषधांची फवारणी करून सोयाबीनची निगराणी केली होती. सोयाबीनला पन्नास टक्के शेंगही लागली होती. सोयाबीन काढणीला आले होते. परंतु काढणीच्या वेळी पाऊस झोडपू लागल्याने हाताला आलेले सोयाबीन पाण्यात वाहू लागले.

soyabean farmer news
Osmanabad : अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला

त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू येऊ लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची पेरणी लवकर केली होती. त्या शेतकऱ्यांनी हाताला आलेले सोयाबीन काढून घेऊन दिवाळी सण साजरा करावा म्हणून विक्रीसाठी बाजार आणले. परंतु बाजार सोयाबीनला भाव नसल्याने शेतकप्यांचा खर्चही हातात पडलेला नाही. शासनाने अतिवृष्टीचे अनुदान मंजूर केले परंतु ते सध्यातरी कागदावरच दिसून येत आहे. अनुदान दिवाळीपूर्वी लाभार्थींच्या खात्यावर पडल्यास बळीराज्याची दिवाळी कशीबशी साजरी होणार आहे. अन्यथा दिवाळी सणावर संकट निर्माण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com