ह्रदयद्रावक : मरणानेही छळले; पोटच्या गोळ्याने फिरवली पाठ, शेवटी...

file photo
file photo

उस्मानाबाद : कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आलेल्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्याच्या कुटुंबियाने नकार दिल्यानंतर अखेर पालिकेला अंत्यसंस्कार करावे लागले. त्यामुळे कोरोनामुळे माणुसकीचा विसर पडतोय का, असा सवाल विचारला जात आहे. 

मुंबई येथून एक कुटुंब परंडा तालुक्यात आले होते. त्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनेक दिवसांपासून फुफ्फुसाचा आजार होता. मुंबईहून आल्याने त्यांना परंड्यातच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची तब्बेत खालावल्याने त्यांना शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही रुग्णालयात होता.

सोमवारी उपचारादरम्यान संबंधीत व्यक्तीचे निधन झाले. मात्र मुलाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत तो गावी परतला. प्रशासनाकडून त्याला जिल्हा रुग्णालयात येऊन मृतदेह ताब्यात घेण्यास सांगण्यात आले. मात्र त्याने प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला नाही.

फोनवरही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, प्रशासनाने त्या व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. पहिला अहवाल अनिर्णित आल्याने स्वॅब नमुना पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने सदर मृत व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही मुलाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने कोरोनामुळे माणुसकीचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

 पालिकेने केले अंत्यसंस्कार 
सोमवारी सदर व्यक्तीचे निधन झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय, तसेच उस्मानाबाद नगरपालिका प्रशासनाकडून मुलाला मृतदेह ताब्यात घेण्याचे आवाहन करण्यात आले होते; मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. मंगळवारपर्यंत वाट पाहून अखेर पालिकेने बुधवारी (ता. २७) शहरातील कपिलधार स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मृताच्या पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह 
मृताला फुफ्फुसाचा आजार होता. मात्र कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला. त्याचे कुटुंबिय मुंबईहून परंड्यात आले होते. त्यामुळे त्याच्या पत्नीचेही स्वॅब घेण्यात आले होते. त्याच्या पत्नीचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून, उपचार सुरु आहेत. 
 

मृत व्यक्तीचे स्वॅब दोन वेळा घेतले. पहिला अहवाल अनिर्णित आला. त्यामुळे दुसऱ्यांदा स्वॅब पाठविला. दुसरा अहवाल निगेटीव्ह आला असून, अहवालामध्ये काहीही चूक होऊ शकत नाही. त्यामुळे ती व्यक्ती निगेटीव्हच होती, असा निष्कर्ष आहे. संबंधीत कुटुंबियांना वारंवार सांगूनही त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही. त्यामुळे पालिकेला सांगून मृतावर अंत्यसंस्कार करावे लागले. 
- डॉ. आर. व्ही. गलांडे, जिल्हा शल्यचिकीत्सक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com