ते गरजूंना देताहेत पोटभर अन्न

उस्मानाबाद : निराधारांना पोटभर अन्न वाटप करण्यासाठी पुढाकार घेणारे अन्नपूर्णा संस्थेचे सदस्य. दुचाकीवरून निराधारांना हे सदस्य डबे पोच करतात.
उस्मानाबाद : निराधारांना पोटभर अन्न वाटप करण्यासाठी पुढाकार घेणारे अन्नपूर्णा संस्थेचे सदस्य. दुचाकीवरून निराधारांना हे सदस्य डबे पोच करतात.

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत निराधार, गरजू कुटुंबियांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत, त्यांना पोटभर अन्न मिळण्यासाठी उस्मानाबाद शहरातील अन्नपूर्णा संस्थेच्या वतीने गरजूंना जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम शुक्रवारपासून (ता. २७) सुरू करण्यात आला आहे.

पहिल्या दिवशी शहरातील जवळपास तीनशे व्यक्तींना, तर दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २८) साडेतीनशे व्यक्तींना या संस्थेच्या सदस्यांनी डबे पोच करून माणुसकीचे दर्शन घडवले. हा उपक्रम १५ एप्रिलपर्यंत सुरू सुरू राहणार असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले. संचारबंदीच्या कालावधीत सर्वाधिक हाल निराधार लोकांचे होत आहेत. बसस्थानकासह शहरातील विविध भागांत निराधार लोक भटकत फिरत असतात. परिसरातील हॉटेलमधून मिळणाऱ्या अन्नावर हे निराधार लोक पोट भरत असत. परंतु सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेलही बंद आहेत. त्यामुळे अशा निराधारांचे हाल सुरू झाले आहेत. त्यांना जेवण, तर सोडा पाणी मिळणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत या निराधारांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत म्हणून येथील अन्नपूर्णा संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.

संस्थेकडून जिल्हा रुग्णालयासमोर अन्नछत्र चालविण्यात येते. त्यात दररोज रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन दिले जाते. हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या असलेल्या संचारबंदीच्या काळात आता संस्थेच्या वतीने निराधार, जे मोलमजुरी करतात, ज्यांचे हातावर पोट आहे, अशा व्यक्तींना जेवणाचे डबे पोच करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याची सुरवात शुक्रवारपासून करण्यात आली.

संस्थेचे बारा सदस्य स्वतः जेवणाचे डबे घेऊन निराधारांना देत आहेत. याशिवाय गोरगरीब कुटुंबाला घरपोच डबे देत आहेत. माणुसकी समाजाचे आपण काही तर देणे लागतो, या भावनेतून हे सदस्य हा उपक्रम राबवित आहेत. निराधार व्यक्तींचा शोध घेत हे सदस्य डबे पोचवत असल्याने उपाशीपोटी भटकंती करणाऱ्या निराधारांना मोठा आधार ठरला आहे. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी जवळपास तीनशे, शनिवारी साडेतीनशे व्यक्तींनी या संस्थेच्या सदस्यांनी डबे पोच केले. 

दक्षता घेत सुरु आहे स्तुत्य उपक्रम 
संस्थेचे सदस्य तोंडाला मास्क लावून, हातामध्ये ग्लोज घालून सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत अन्नदानाचे काम करीत आहेत. यासाठी सकाळपासूनच तयारी केली जाते. भोजन तयार झाल्यानंतर सहा वाहनांवर बारा सदस्य दुचाकीने शहराच्या विविध भागात फिरून निराधारांना अन्नदानाचे वाटप करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com