pankaja munde
sakal
लातूर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू ही अत्यंत धक्कादायक घटना होती. अजूनही आपण अनेकजण या धक्क्यातून सावरलेलो नाही. ज्यांना या घटनेने अत्यंत वाईट वाटले आहे, ते आपल्या संवेदना व्यक्त करीत आहेत. पण, काही जण दिशाभूल करणारी वक्तव्य करीत आहेत. राजकारणात सर्वांनी पथ्य पाळावे, असे मत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (ता. ३) येथे व्यक्त केले.