Parbhani : कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या; जिंतूर शहरातील घटना

यावर्षी पाऊस कमी पडल्याने विलास रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली.
parbhani
parbhani sakal

जिंतूर शहरातील पाटील विहीर परिसरात एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणा त्यातच प्रापंचिक प्रश्न या विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील घटना रविवारी दुपारनंतर शहरातील पाटील विहीर परिसरात घडली. विलास रामराव रोकडे असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

यावर्षी पाऊस कमी पडल्याने विलास रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली.त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत राहत असत त्यातच घरसंसार, मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न तसेच औषधाची उधारी यासारखे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले असल्याच्या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळपास घेऊन मरणाला कवटाळले.

parbhani
Madaj Sucide Case:मराठा युवकांनी टोकाचं पाऊल उचलू नये, रोहित पवारांचे आवाहन

नातेवाईकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,त्यांच्या पश्चात आईवडील,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.या घटनेमुळे

parbhani
Nanaware Sucide Case: ननावरे दांपत्य आत्महत्या प्रकरणात पोलिसांचं अटकसत्र सुरु, ६ ते ७ जणांना ठोकल्या बेड्या

घरातील कर्ता पुरुष गेल्याने रोकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे. बातमी लिहीपर्यंत घटनेची नोंद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com