Parbhani : साखर कारखान्याच्या धुरामुळे नागरिक हैराण

साखर कारखान्याच्या चिमणीची कमी असणारी उंची बहुधा यासाठी कारणीभूत
sugar factory
sugar factorysakal

पाथरी : तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या रेणुका शुगर्स साखर कारखान्याच्या चिमणीतून निघणाऱ्या धुरातून पाथरी शहर व परिसरामध्ये राख व काजळी पडत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराच्या शेजारी देवनांद्रा परिसरात पूर्वीचा गोदावरी दुधना तर आताचा रेणुका शुगर्स साखर कारखाना असून, हा कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा मागील तीन दशकांपासून अर्थकारणाचे मुख्य स्त्रोत म्हणून ओळखले जातो.

हा कारखाना आर्थिकदृष्ट्या सर्वांच्या फायद्याचा असला तरी आरोग्याच्या दृष्टीने नुकसानीचा ठरत आहे, तो या कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे. पूर्वी पाथरी शहराचा विस्तार कमी असल्याने या साखर कारखान्यातून निघणाऱ्या धूर व काजळीचा परिणाम तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिसून येत नव्हता. परंतु, आता विस्तारलेल्या पाथरी शहराला धूर व काजळी त्रासदायक ठरू लागली आहे. सदरील साखर कारखान्याच्या चिमणीची कमी असणारी उंची बहुधा यासाठी कारणीभूत ठरत आहे.

गळीत हंगाम सुरू झाल्यापासून शहरातील गुलशन नगर, ज्ञानेश्वर नगर, शिवाजी नगर, शाहू नगर, शिक्षक कॉलनी, ओंकार नगर यासह जायकवाडी वसाहत या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. घराची गॅलरी, बाहेर सोडलेली वाहने, उन्हामध्ये वाळू घातलेली कपडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात काजळी जमा होत आहे. त्यामुळे स्थानिक गृहिणी अक्षरशः वैतागून गेल्या आहेत. सोबतच हवेमध्ये पसरणारी काजळी लहान बालकांसह ज्येष्ठ नागरिकांच्या श्वसन विकारास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com