नववर्षात परभणीकरांचे स्वप्न पूर्ण होणार !

file photo
file photo

परभणी : महापालिकेच्या धर्मापुरी येथील जलशुध्दीकरण केंद्रातून शनिवारी (ता.२८) शुध्द पाणी मुख्य जलवाहिण्यातून दोन किलोमिटर अंतरापर्यंत आले. त्या पाण्याचा प्रथमतः जलवाहिण्यातील धुण्यासाठी वापर केल्या जात असून माती, केरकचरा स्वच्छ केल्या जात आहे. सोमवार-मंगळवारपर्यंत शहरातील दोन एमबीआर भरण्यास सुरवात होणार आहे. नविन पाणीपुरवठा योजनेतून मिळणाऱ्या पाण्याची नागरीक कित्येक वर्षापासून प्रतीक्षा करीत असून त्यांचे शुध्द व मुबलक पाणी मिळण्याचे स्वप्न नववर्षाच्या प्रारंभीच पूर्ण होणार आहे. 

येदलरी येथे उदभव असलेल्या या योजनेतून धर्मापुरी येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या सर्व प्रकारच्या चाचण्या केव्हाच पूर्ण झालेल्या असून धर्मापुरी येथून शहरात पाणी आणण्यासाठी पालिकेचे आयुक्त रमेश पवार हे कसोसीने प्रयत्न करीत होते. परंतु, त्यामध्ये जलशुध्दीकरण केंद्रातील ३३ के.व्हीचे विद्युत केंद्र कार्यान्वित करण्यासाठी एक्सप्रेस फिडरचा मोठा अडथळा होता. परंतु, ते अडथळा देखील आता दुर झाला असून विद्युत केंद्र व विद्युत पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्रातून शहराला पाणी पुरवठा करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

शनिवारी झाली पहिली चाचणी
धर्मापुरी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील साठवण टाकीत शुध्द करून ठेवलेले पाणी शहराला सोडण्याची शनिवारी (ता.२८) चाचणी घेण्यात आली. ते पाणी धर्मापुरीपासून शहराकडे जवळपास कॅनॉलपर्यंत आले आहे. त्या पाण्याने जलशुध्दीकरण केंद्र ते परभणी येथील मुख्य दोन एमबीआर पर्यंतची मुख्य जलवाहिण्या स्वच्छ केल्या जाणार आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात माती, छोटे-मोठे दगडगोटे पडलेले असून ते बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. त्याच बरोबर येलदरी ते धर्मापुरी दरम्यान, देखील पाणी सोडण्यास सुरवात झालेली असून त्या जलवाहिण्या भरण्यासाठीदेखील काही वेळ लागणार आहे. तेथून आलेल्या पाण्याचे शुध्दीकरण केल्यानंतर ते पाणी शहराला सोमवार किंवा मंगळवारपर्यंत सोडले जाणार आहे.

टप्प्याटप्प्याने भरणार शहरातील जलकुंभ...
धर्मापुरी येथून आलेल्या पाण्याने विद्यानगर व खाजा कॉलणी येथील एमबीआरच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक एमबीआर दररोज एक मिटर भरली जाणार असून त्यासाठी पाच दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहेत. हे एमबीआर पूर्ण भरल्यानंतर त्याच्या क्षमतेची देखील चाचणी घेतली जाणार असून एक-दोन दिवस पाणी त्यामध्ये साठवून ठेवले जाणार असून त्यानंतर अन्य नव्या जुन्या जलकुंभांकडे (ईएसआर) चाचण्यांसाठी पाठवले जाणार आहे. शहरात असे नवे १२ जलकुंभ असून त्याच्या चाचण्या घेण्याचे काम नंतर सुरू होईल.


तीन नव्या जलकुंभांना जुन्याच नळजोडण्या..
विद्यानगर व खाजा कॉलणी येथील एमबीआर व नव्या, जुन्या जलकुंभांना जलवाहिण्यांद्वारे जोडण्यात आलेले आहेत. परंतु, १२ पैकी केवळ तीनच नव्या जलकुंभांना जुन्या नळजोडण्या जोडण्यात आलेल्या आहेत. उर्वरीत जलकुंभांवर नविन नळजोडण्या देण्यात आलेल्या नसून सोमवारी (ता.३०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेतील या विषयाच्या निर्णयानंतर नळजोडण्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. तोपर्यंत जुने जलकुंभ व नवे तीन जलकुंभातून शहराला पाणी पुरवठा सुरु होण्याची शक्यता आहे.



नविन जलकुंभांच्या चाचण्या होणार 
धर्मापुरी येथील जलशुध्दीकरण केद्रांतून शनिवारी शुध्द पाणी शहराकडे सोडण्यात आलेले असून ते दोन किलोमिटर अंतरापर्यंत आले आहे. सुरवातीला शहरातील दोन एमबीआरची व नंतर नविन जलकुंभांच्या चाचण्या होणार आहेत. सोमवार-मंगळवारपासून एमबीआर भरण्यास सुरवात होणार आहे. पालिका नव्या वर्षाच्या प्रारंभी शहराला पाणी देण्याचा कसोसीने प्रयत्न करीत आहे.
रमेश पवार, आयुक्त, महापालिका, परभणी.

 


मुबलक पाणी मिळेल
महापालिकेचे शासन व प्रशासन अतिशय युध्दपातळीवर शहराला या योजनेतून पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहे. निर्माण होणाऱ्या तांत्रिक त्रुटी तात्काळ दुर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या महिण्यात निश्चितच या योजनेतील शुध्द व मुबलक पाणी नागरीकांना मिळेल.

सचिन देशमुख, सभापती, स्वच्छता व आरोग्य समिती
महापालिका, परभणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com