पिकांची दैना, सर्वच हातचे गेले

Damaged Crops
Damaged Crops

अंबड (जि.जालना) : सततच्या दुष्काळ, भीषण पाणीटंचाई व रोगराई, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. मात्र या वर्षी पावसाळा सुरु झाल्यापासून कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी त्यातच जोराचे वादळ वारे पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा पाऊस पाणी बरा असल्याने शेतकरी, पशुपालक समाधान व आनंद व्यक्त करत होता. मात्र हे जास्त काळ टिकवुन राहिले नाही. खरीपांच्या उत्पन्नातून जगविलेल्या आशा पूर्णपणे फौल ठरल्या आहेत.

उत्पन्न मिळेल, या अपेक्षांने उत्पन्नाचे अंगी बाळगलेले स्वप्न अखेर भंग पावले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची दाणादाण उडाली आहे. सर्वच हातचे गेले आहे. यामुळे शेतकरी आता सरकारला आर्त हाक देत आहे. सरकार मायबाप सरकार खरीपांतील कपाशी, तूर, सोयाबीन, मका, मूग, उडीद आणि बाजरीसह आदी पिकांची माती झाली आहे. मोसंबी, डाळिंब, पपई, चिकुसह आदी फळबाग तसेच नगदी पिक असणाऱ्या ऊसाची पुरी नासाडी झाली आहे. खरीप पिकांसह फळबागांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊन जगविण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, अशा प्रकारचा टाहो शेतकरी फोडत आहे.


शेतकरी गत अनेक वर्षांपासुन अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करत आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ त्याच्या पाचवीलाच पुजला आहे. दुष्काळाचे चटके सहन करित असताना कोरोनासारखे जागतिक महामारीचे संकट उभे राहिले आहे. शेतकरी पुरता हतबल झाला आहे. सरसकट नुकसान भरपाई द्यावी.
- भाऊसाहेब कनके, शेतकरी

या वर्षी पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारने अर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
काशिनाथराव उगले, शेतकरी

संपादन- गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com