Video : आठवडे बाजारावर ‘कोरोना’चे सावट- कुठे ते वाचा 

Nanded News
Nanded News

नांदेड : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने राज्यातील शाळा, महाविद्यालयांसह कोचिंग क्लासेस, स्विमींग पूल, चित्रपटगृहांसह लग्न, सभांवर निर्बंध जारी केले आहेत. राज्यभरात आपत्ती व्यवसथापन कायदा लागू करण्यात आल्याने आठवडे बाजारही बंद करण्यात आले आहेत. शहरातील जुना मोंढा आठवडे बाजारात रविवारी (ता.१५) शुकशुकाट दिसून आला. ग्रामीण भागातून आलेल्या भाजी विक्रेत्यांना ग्राहकांअभावी नुकसानीला सामोरे जावे लगले तर शेतकऱ्यांनी खर्चही निघत नसल्याची खंत व्यक्त केली. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात आपत्ती व्यवसथापन कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जागृती व दक्षताच्या सूचना देण्यात येत आहेत. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपीषद कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांसह चित्रपटगृह, स्वीमींगपुल मंगळवार (ता. ३१) पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जमावबंदी आदेशा लागू करण्यात आल्याने जिल्ह्यातील नियोजित सभा, व्याख्यानांसह सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मंदिर, मशिदीतील धार्मिक कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या शिवाय लग्न समारंभावरही निर्बंध जारी करण्यात आले असून मंगल कार्यालय चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आठवडे बाजार प्रतिबंधित करण्यात आल्याने रविवारी शहरातील जुनामोंढा परिसरात महापालिका प्रशासनाने मंगळवार (ता. ३१) पर्यंत आठवडे बाजार बंद राहण्याच्या सूचना ध्वनीक्षेपकाद्वारे दिल्या आहेत.

ध्वनीक्षेपकाद्वारे सुचना 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील आठवडे बाजारांवर शनिवारी (ता. १४) प्रतिबंध जारी करण्यात आला. पण रविवारी (ता. १५) ग्रामीण भागातून शेतकरी, व्यवसायिक, व्यापारी फळ- भाजी विक्रीसाठी जुना मोंढा परिसरात दाखल झाले. महापालिका प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू करताच शेतकरी, व्यापाऱ्यांनी आम्ही विक्रीसाठी आणलेल्या मालाचे काय करायचे, आधीच खेरदीसाठी ग्राहक बाजाराकडे फिरकत नसल्याची चिंता व्यक्त करत ऐनवेळी दिलेले बाजार बंदचे निर्देश सोमवार (ता.१६) पासुन लागू करण्याची मागणी केली. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सोमवार (ता. १६) पासून शहरातील आठवडे बाजार बंद राहण्याच्या सूचना दिल्या. 

येथे क्लिक कराPHOTOS : कशामुळे वाढतेय थंड पेयांच्या दुकानांवर गर्दी
 
डोंगरा एवढ्या समस्येला तोंड द्याचे कसे
कोरोनाच्या धास्तीने नागरिकांनी आठवडे बाजारांकडे पाठ फिरविल्याने भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. पदरमोड करून ग्रामीण भागातून खरेदी केलेल्या मालातून खर्चाचीही बरोबरी होत नाही. त्यातच शिल्लक मालाचे नुकसान होत असल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. शेतातील फळ- भाजीपाला वेळेत विक्रीसाठी बाजारात आणावा लागतो. त्यामुळे बाजारात मिळेल त्या भावात विक्री करावे लागते. आठवडाभरापासून शहरातील आठवडा बाजाराकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने एकीकडे काढणीअभावी शेतात तर दूसरीकडे भाव घसरल्याने बाजारात अशा दुहीरी नुकसानीला तोंड द्यावी लागत आहे. त्यातच आता आठवडे बाजार बंदचे निर्देश देण्यात आल्याने नुकसानीची डोंगरा एवढी समस्या निर्माण झाल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com