tomato
sakal
अर्धापूर जिल्हा नांदेड) - टमाट्यांना घाऊक बाजारात मागणी घटल्याने टमाटे घेण्यासाठी व्यापारी तयार नाहीत. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्च निघणे अवघड झाले आहे. टमाटे शेतात सडु लागले आहेत.काढणीचा खर्च निघत नसल्याने टाक्यांच्या शेतात जनावरे सोडण्याची वेळ आली आहे. टमाटे फुकट घेऊन जाण्यासाठी कोणीही तयार होत नाही. टमाटा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.