४६ हजार शेतकऱ्यांची नोंदणी; कापूस खरेदी प्रक्रिया सुरू

file photo
file photo

परभणी : शिल्लक राहिलेला कापूस विक्री करण्यासाठी ता. २७  एप्रिल या अंतिम तारखेपर्यंत परभणी जिल्ह्यात ४६ हजार ७७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आता नोंदणीचा डाटा जिल्ह्यातील बाजार समित्यांना दिला जाणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना कापूस घेऊन बोलावले जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
यंदा कापसाचा हंगाम उशिरापर्यंत सुरू राहिला. पाऊस नोव्हेंबर २०१९ पर्यंत राहिल्याने कापसाचे उत्पादन वाढले. शासकीय खरेदी केंद्र फेब्रुवारी महिन्यात सुरू झाले होते. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, भारतीय कापूस निगम व खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली होती. परंतु, हमीभाव केंद्रावर चांगला भाव असल्याने शासकीय खरेदी केंद्रावर सर्वाधिक गर्दी होऊ लागली. त्यामुळे बहुतांष शेतकऱ्यांनी गर्दी कमी होण्याची वाट पाहिली. परंतु, पुढे खरेदी केंद्रच बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात राहिला आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यात कापूस खरेदी थांबविण्यात आली. त्यानंतर लॉकडाउन सुरू झाल्याने विक्रीच्या सर्व वाटा बंद झाल्याने शेतकऱ्यांनी शासनाने सातत्याने मागणी करत कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळे शासनाने कापूस खरेदी सुरू करण्याचे जाहीर करत ता. २१ पासून शेतकऱ्यांची नोंद करण्यास सुरवात केली. त्यानुसार शासनाने लिंक देत त्यावर शेतकरी, त्यांचे नाव, पत्ता, कापसाचे छायाचित्र अशी माहिती संकलित केली आहे. ता. २७ ही नोंदणीसाठी अंतिम मुदत होती. आतापर्यंत ४६ हजार ७७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

  आतापर्यंत २२ लाख क्लिंटल खरेदी
ता.१९ मार्चअखेरपर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २२ लाख ३६ हजार १३३ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यात १९ लाख ७० हजार ८३९ क्विंटल आणि हिंगोली जिल्ह्यात दोन लाख ६५ हजार २९४ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

तालुकानिहाय नोंदणी संख्या
गंगाखेड ८,३१६, परभणी ७,६८४, मानवत ६,३६८, पालम ६,३१६, सेलू ५,३५६, पाथरी ४,६०४, सोनपेठ ३,६८६, जिंतूर ३,६८६, पूर्णा १,४१९, एकूण ४६ हजार ७७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.


हेही वाचा - हिंगोलीत पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागन
 

कागदपत्रे घेऊन यावे
कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली असून नोंदणी झालेली माहिती बाजार समित्यांना दिली आहे. आता बाजार समिती संबंधित शेतकऱ्यांना क्रमाने संदेशासह दूरध्वनीद्वारे बोलावणार आहेत. त्यानंतरच शेतकऱ्यांनी कापूस आणि विहीत कागदपत्रे घेऊन यावे.
- मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक, परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com