

कन्नड - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महायुती सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. मात्र, सरसकट कर्जमाफी न करता गरीब व दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या शेतीकर्जावरील व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, यासाठी प्रभावी योजना आणली जाणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता. चार) दिले.