Water Issue : भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती; अर्धाधिक पावसाळा उलटला तरी जलसाठे कोरडेच!

जूनच्या शेवटी पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर पावसाने कायमचीच उघडीप दिली. पाचवीला पुजलेल्या पाणीटंचाईने यंदाही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले.
water shortage in pachod

water shortage in pachod

sakal

Updated on

पाचोड - पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा काळ आटोपता झाला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने व प्रशासनाच्या वतीने सुरू असलेले ३५ गावांचे ४९ टँकर मुदत संपल्याने भर पावसाळ्यात नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याची नामुष्की ओढवली असून सर्व जलसाठे कोरडीठाक असल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) सह चौफेर पाहवयास मिळत असून तालुका प्रशासनाच्या वतीने टँकर पूर्ववत सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com