
धाराशिव : जिल्ह्यातील २१ हमीभाव खरेदी केंद्रांत सोयाबीन विक्रीसाठी १९ हजार ८६४ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार २८ शेतकऱ्यांकडून ६७ हजार ६२३ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. तसेच, आतापर्यंत १ हजार १७४ शेतकऱ्यांना त्यांच्या १८ हजार २३० क्विंटल सोयाबीनच्या विक्रीपोटी ८ कोटी ९१ लाख ८१ हजार १६० रुपये देण्यात आले आहेत.