Loksabha 2019 : मतदारांच्या भर उन्हात रांगा, सावलीची सोय नाही, कर्मचारीही घामाघुम

aurangabad
aurangabad

औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी मतदानाला सुरळीत सुरुवात झाली. दुपारी अकरा वाजेपर्यंत सरासरी 18 ते 22 टक्‍क्‍यांच्या दरम्यान मतदान झाले. मात्र निवडणूक आयोगाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मतदार आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. 

सिडको परिसरातील आंबेडकर नगर या अती संवेदनशील मतदान केंद्रावर अंधार्‍या कोंदट पत्र्याच्या खोल्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी पंखा नसल्याने उकाड्यामुळे मतदान कर्मचारी हतबल झाले आहेत. केंद्राच्या बाहेर पेंडॉल टाकलेला नसल्यामुळे मतदारांना उन्हात रांगा लावाव्या लागल्या आहेत. 

आंबेडकर नगर हे अती संवेदनशील मतदान केंद्र असल्याने सीआयएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com