जालना - तालुक्यातील वरूड शिवारात शेत काम करत असताना विजेचा धक्का लागून वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मंगळवारी (ता. १०) दुर्दैवी मृत्यू झाला..वरुड शिवारातील शेतातमध्ये विनोद तुकाराम म्हस्के (वय-३०) शेतात शेतीकाम करत होते. शेतामध्ये मल्चिंग पेपर अंथरत असताना शेतातून विद्युत प्रवाह घेऊन जाणारे केबल कटल्याने विनोद म्हस्के यांना विजेचा धक्का बसला..या विजेच्या धक्क्याने विनोद म्हस्के जमिनीवर कोसळले. वडील जमिनीवर का पडले हे पाहण्यासाठी बाजूला खेळणारी श्रद्धा (वय-१२) आणि समर्थ (वय-१०) हे दोन चिमुकले वडिलांना उठवण्यासाठी गेले..परंतु, विनोद मस्के यांच्या अंगात विद्युत प्रवाह असल्याने या दोन चिमुकल्यांनाही विजेचा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना विनोद मस्के यांच्या पत्नी यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरोड केली..म्हस्के यांच्या शेतामध्ये सुरू असलेला आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली विद्युत प्रवाह खंडित केला. त्यानंतर विनोद मस्के श्रद्धा आणि सार्थक या तिघांना जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर या तिघांना मत घोषित केले..या तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णाण्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही घटना वटपौर्णिमेच्या दिवशीच घडल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.