Dharashiv news: अवकाळीने नुकसान, पण ‘ई-पीक पाहणी’च नाही; केवळ २३. ९ टक्के नोंदणी, ७६.१ टक्के शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

Unseasonal Rain Causes Heavy Crop Damage: अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान; ई-पीक पाहणी नोंदणी कमी;नोंदणीअभावी ७६% शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील बळीराजासमोर आता एक नवीन तांत्रिक संकट उभे ठाकले आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील फळबागा आणि रब्बी पिकांचे अतोनात नुकसान केले असून प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले आहेत. मात्र, धक्कादायक वास्तव असे आहे की, जिल्ह्यातील तब्बल ७६.१ टक्के शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या पिकांची ''ई-पीक पाहणी'' नोंदणी केलेली नाही. त्यामुळे नुकसान होऊनही केवळ या नोंदणीअभावी हजारो शेतकरी शासकीय मदत आणि पीकविमा भरपाई लागू झाल्यास त्याच्या लाभापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com