धानोरा - अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात गेल्या आठ दिवसापासून सतत अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे आंब्यासह टरबुजाची नासाडी होत आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले फळपीक हातून जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. .धानोरा परिसरात गेल्या आठ दिवसापासून सतत अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे शेतात असलेल्या टरबूज आणि आंबे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस उघडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आंबे झाडावरून काढता येत नाही. वारे आणि पावसामुळे आंब्याची मोठी नासाडी झाली आहे..शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली आंब्याची फळबाग पावसाने हिरावून घेतली आहे. धानोरा परिसरातील काही शेतकऱ्यांनी टरबुजाची शेती केली आहे. मे महिन्यात टरबूजाला चांगला भाव मिळेल हे अपेक्षाने शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने केलेली टरबुजाची शेती अवकाळी पावसामुळे अडचणीत आली आहे..सतत पाऊस पडत असल्यामुळे टरबूज जागेवरच नासून जात आहे. पाऊस आधी टरबुजाचा भाव 14 ते 15 रुपये किलो दर होता. आता दरही घसरले आहेत. आता टरबुजाचे दर पाच ते सहा रुपये किलो सुरू आहेत. जीवाचे रान करून पिकवलेले टरबुजाचे 50 टक्के पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे.टरबुजा साठी केलेला खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी केलेल्या टरबूज फळ पिकास अवकाळी पावसाने फटका दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे..प्रतिक्रियामी सव्वा एकर क्षेत्रामध्ये टरबुजाची लागवड केली आहे. मे महिन्यात टरबूजला चांगला दर मिळेल या अपेक्षेने टरबूज लागवड केली होती. टरबूज देखील चांगले आले आहेत. सतत पाऊस सुरू असल्यामुळे टरबूज जागेवरच नासून जात आहे. केलेला खर्च देखील निघणे अवघड झाले आहे. शासनाने पंचनामे करून आम्हाला मदत करावी.- गोपीचंद देशमुख, शेतकरी देवळा, ता. अंबाजोगाई.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.