Bhaskar Chandanshiv
sakal
मराठवाडा
Bhaskar Chandanshiv: गावगाड्याच्या दुःखाचा आवाज हरपला; प्रा. भास्कर चंदनशिव यांचे लातूरला निधन, कळंब येथे अंत्यसंस्कार
Marathi Writer: ग्रामीण भागाचे जगणे व शेतकऱ्यांच्या व्यथा साहित्याच्या लेखणीतून जिवंत करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने ग्रामीण साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
लातूर/ कळंब : ग्रामीण भागातील लोकांचे जगणे, शेतकऱ्यांच्या व शोषितांच्या व्यथा-वेदना लेखणीतून वाचकांच्या डोळ्यांसमोर समर्थपणे उभे करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव (वय ८१) यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास खासगी रुग्णालयात निधन झाले. कळंब (ता. धाराशिव) येथे सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने गावगाड्याचे दुःख मांडणारा, ग्रामीण साहित्याला नवा आयाम देणारा लेखक हरपल्याची भावना साहित्यवर्तुळातून व्यक्त होत आहे.

