गेवराई - पहिले दोन वर्ष पाच- पाच तास नंतरचे तीन वर्ष आठ ते दहा तास जीव ओतून आभ्यास करत चिकाटी ठेवून गेवराईच्या दोन हजार लोकसंख्येच्या रांजणी गावातील विजय सावंत हा पहिलाच सीए झाल्याने त्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे..धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेले रांजणी हे साधारण दोन हजार लोकसंख्येचे गाव शेती करून आपल्या कुटुंबाची गुजराण करणा-याची संख्या जास्त असून, हाकेच्या अंतरावर एक सहकारी साखर कारखाना तसेच गेवराई शहर जवळच असल्याने रोजगार संधी उपलब्ध झाल्याने नोकरदार देखील गावात ब-यापैकी आहेत. याच रांजणीच प्रा. डॉ. कैलास सावंत यांचा मुलगा विजय सावंत यांनी नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाऊंट(सीए)च्या कठीण अशा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले..भारत देशातील कठीण अशी सीएची परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येते. या तिन्ही टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक नोंदी ठेवणे, आर्थिक विवरणपत्रे तयार करणे आणि त्यांचे परीक्षण करणे यासंबंधी अधिकार प्राप्त होतात..इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) द्वारे घेण्यात येणाऱ्या या महत्त्वाच्या विजय कैलास सावंत यांनी यश संपादन केले आहे. त्यांनी मे २०२५ मध्ये दिलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून त्यामध्ये उत्तीर्ण होऊन चार्टर्ड अकाऊंट (सीए) ची पदवी पूर्ण केली आहे..या गौरव पुर्ण व दैदिप्यमान यशाबद्दल माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, जय भवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. जयसिंग पंडित, आमदार विजयसिंह पंडित, यांच्यासह सरपंच आसाराम रोडगे, माजी सरपंच गणेश सावंत, अॅड. विलास सावंत व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे..आई, वडिल यांचे मार्गदर्शन घेऊन नियमित जिद्द, चिकाटी ठेवून प्रारंभीचे दोन वर्ष पाच-पाच तास तर नंतर तीन वर्ष रोज दहा तास आभ्यास केल्यास यश निश्चितच मिळते.- विजय सावंत, राजंणी..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.