
जालना - उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती होऊ नये म्हणून जिल्हाभरातील वन क्षेत्रात वन विभागातर्फे २८ ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहे.
वर्ष २०१८ च्या उन्हाळ्यात दुष्काळी स्थितीत वन्य प्राण्यांचे अन्न व पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागली. पाण्याच्या शोधात हरीण, काळवीट यासारखे तृणभक्षी प्राणी मानवी वस्तीत आल्याचे पहायला मिळाले. मार्च महिन्यात वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.
हेही वाचा : उन्हाळ्याच्या प्रारंभीच पावसासह गारपीट
गत वर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा वन्य प्राण्यांसाठी आतापर्यंत मुबलक पाणी उपलब्ध असले तरी उन्हाचा पार वाढत असल्याने वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यामधील पाणी कमी होत आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्याच्या विचार करून वन विभागातर्फे वन्य प्राण्यांसाठी २८ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात वन क्षेत्र असलेल्या आठही तालुक्याच्या ठिकाणी पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या आठवड्यातून दोन वेळा या पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडल्या जात आहे.
गत वर्षी झालेल्या अतिवृष्टी जिल्ह्यातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पाणवठ्यात सध्याही पाण्याबरोबर वनक्षेत्रात चाराही उपलब्ध आहे. त्यामुळे प्राण्यांची भटकंती होणार नाही.
जिल्ह्यातील वनक्षेत्रात बिबटे, अस्वल, लांडगा, कोल्हा तसेच हरिण काळवीट, नील गाय, रोही आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा उन्हाळ्याच्या दृष्टीकोणातून वन्यप्राण्यांसाठी जिल्ह्यातील वनक्षेत्रात आवश्यक ठिकाणी पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यात नियमित पाणी सोडण्यात येत आहे.
- श्रीकांत इटलोट,
वनपरिक्षेत्र अधिकारी, जालना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.