शेवाळ अडवतेय पाणी!

Water-Supply
Water-Supply

औरंगाबाद - कधी पाइपलाइन फुटल्याने, कधी वीज गुल झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवते. त्यात जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने आता शेवाळाचे संकट आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंपगृहातील विहिरींत शेवाळ, गवत येत असून, ते पंपात अडकल्याने पाण्याचा उपसा पाच एमएलडीने घटला आहे.

शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होत आहे. त्यामुळे नगरसेवक, नागरिकांनी रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात आंदोलने केली. दरम्यान, प्रशासनाने तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानंतरही पाणीटंचाईचे संकट कायम आहे. दुसरीकडे जायकवाडी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. सध्या पातळी ४५८.१२८ मीटरवर येऊन ठेपली आहे. आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर धरणाची पाणीपातळी आणखी घटेल. आताच महापालिकेचा पाणी उपसा पाच एमएलडीने कमी झाला आहे. महापालिकेच्या वीजपंपात शेवाळ, गवत व इतर कचरा येऊन अडकत असल्याने ही घट झाली आहे. 

दरम्यान, शेवाळ, गवत, केरकचऱ्याचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने तो काढण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुणे येथील तज्ज्ञ पाणबुड्यांना पाचारण केले आहे. रविवारी (ता. एक) हे पाणबुडे येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले. 

असा झाला परिणाम
गेल्या दोन महिन्यांत महापालिका दररोज सुमारे १४५ ते १५० एमएलडी पाणी उपसा करीत होती. शेवाळ, गवतामुळे आठवडाभरापासून १४० ते १४५ एमएलडी पाण्याचा उपसा होत आहे, तर शहरात केवळ १२० ते १२५ एमएलडी पाणी येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com