हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपिट; सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील स्थिती

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सेनगाव तालुक्यातील जयपूरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावामधील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतेय.
सेनगाव जयपूर पाणी टंचाई
सेनगाव जयपूर पाणी टंचाई

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सेनगाव तालुक्यातील (Hingoli sengaon water shortage) जयपूरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावामधील महिलांना हंडाभर (ladeis ) पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतेय. Women's pipe for potable water; Situation at Jaipur in Sengaon taluka

सध्या मे महीना सुरु असून सेनगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कडक उन्हामध्ये महिलांना कोसोदुर पायपिट करावी लागत आहे. तालुक्यातील जयपुरमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असून गावापासून काही अंतरावरच मोठे धरण असून सुध्दा याचा फायदा गावकऱ्यांना होत नसल्याचे ग्रामस्थामधून बोलल्या जात आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था निर्माण झाली आहे. पाण्याच्या थेंबाथेंबा साठी महिलाना वनवन भटकंती करावी लागत आहे. तसेच जीव धोक्यात टाकून विहिरीतुन पाणी काढण्यासाठी सुध्दा महिला वर्ग मोठी कसरत करताना दिसून येत आहे.

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात सिध्देश्वर कोविड सेंटर रुग्णासाठी ठरतेय वरदान

सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील बोर हातपंप विहिरी यांनी तळ गाठलाय, गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी नेहमीच होत असते. या ठिकाणी जवळपास १५० फूट तळ गाठलेल्या विहिरीतुन पाणी काढण्यासाठी जीव धोक्यात टाकला जात आहे. तेव्हा कुठे तरी कुटुंबीयांची तहान भागवली जाते. दुष्काळामुळे शेतात पोट भरु शकत नाही. म्हणून अनेकांनी औरंगाबाद- पुणे- मुंबई सारखे महानगर गाठले. आणि गावात असलेल्या नागरिकांवर प्यायला पाणी मिळत नाही म्हणून वनवन कोसोदुर भटकंती करण्याची वेळ आली आहे. परंतु ग्रामपंचायत व प्रशासनाकडून आतापर्यंत कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही.

गावातल्या विहिरी, हातपंप, बोअरने में महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. येथील गावकऱ्यांनी मागील दहा वर्षापासून प्रशासनाकडे गावाला कायमस्वरुपी पाणी देण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा देखील केला. प्रशासन दरबारी आंदोलने केली. मात्र प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थामधून केला जात आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने आमच्या भावना समजून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील महिला व नागरिकांमधून जोर धरु लागली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com