Railway Accident: रेल्वे अपघाताचे सत्र सुरुच, दरदिवशी १० प्रवाशांचा मृत्यू; न्यायालयाचे प्रशासनावर ताशेरे

Mumbai Local: रेल्वे अपघात थांबण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. तरीही अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. यावर उच्च न्यायालयाने प्रशासनाला भूमिका बजावण्याचे आदेश दिले आहेत.
Mumbai Local Train
Mumbai Local TrainESakal
Updated on

मुंबई : लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूंची संख्या मागील १५ वर्षांत ४६ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला असला तरी दिवसाला १० प्रवाशांचा मृत्यू होणे ही चिंताजनक बाब आहे. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजना पुरेशा नाहीत हे स्पष्ट होते, असे ताशेरे उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २०) ओढले. तसेच ९ जून रोजी लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com